खरवंडी ग्रामपंचायत थकीत भाडे गाळ्यांचा लिलाव करावा – अन्यथा तीव्र आंदोलन करणार गोरक्षनाथ कातोरे

नेवासा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे खरवंडी ग्रामपंचायत व्यापारी गाळ्याचा लिलाव न झाल्याने ग्रामपंचायतचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे याविषयी वरिष्ठांकडे केलेल्या अर्जांना सकारात्मक उत्तर असूनही वरिष्ठांच्या आदेशांना न जुमानणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई असे निवेदन गोरक्षनाथ एकनाथ कातोरे यांनी दिले आहे

नेवासा तालुक्यातील खरवंडी ग्रामपंचायतचे सुमारे वीस वर्षांपूर्वी गाळे बांधलेले आहेत खरवंडी गावातील व्यापारी गाळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच व्यापाऱ्यांकडे आहेत सध्याची व्यापारी गाळे लिलाव करून विकले तर त्या मधून येणाऱ्या ग्रामपंचायत महसूल वाढणार आहे या गोष्टीकडे ग्रामस्थ गोरक्षनाथ कातोरे यांनी लक्ष वेधले असता स्थानिक ग्रामसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले यावर कातोरे यांनी गटविकास अधिकार्याकडे निवेदन सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी याबाबत सदरच्या व्यापारी गाळ्याचा लिलाव व्हावा असे आदेश ग्रामसेवकांना 28 एप्रिल 25 रोजी काढले होते

पण गेले चार महिने या आदेशाला ग्रामसेवकांनी अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होतच आहे अखेर कातोरे यांनी या विरुद्ध जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास गावकऱ्यांसह आंदोलन करण्यात येतील असे निवेदनात म्हटले आहे

Leave a Reply